विभागा बद्दल

This is the header banner section for the current page titled "विभागा बद्दल".

सार्वजनिक बांधकाम विभाग, पालघर
PWD Palghar Logo

सार्वजनिक बांधकाम विभाग, पालघर

पालघर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचा आधारस्तंभ

परिचय

पालघर—जिथे अरबी समुद्र आणि सह्याद्री रांग एकत्र येतात; जिथे वारली चित्रकला, तारपा नृत्य आणि औद्योगिक क्रांती एकाच मातीत श्वास घेतात. ही भूमी आहे घोलवडच्या रसाळ चिकूची, वाडा–कोलमतांदळाच्या चविष्टतेची, सातपाटीच्या जगप्रसिद्ध ‘राज्यमासा’ चंदेरी पापलेटची, तसेच केळवा/माहिम/बोर्डीच्या रम्य समुद्रकिनार्यांची. इथे तारापूर अणुशक्ती प्रकल्प, डहाणू औष्णिक विद्युत केंद्र यांसारखे आधुनिक उद्योग आणि वसई–तारापूर किल्ल्याचा समृद्ध इतिहास एकत्र नांदतात.

या भूमीत वारली, कातकरी व मल्हार कोळी आदिवासी बांधवांचे साधे जीवन आणि महानगरांची गती यांचा सुंदर मिलाप पाहायला मिळतो. सागरी, नागरी व डोंगरी विविधतेने नटलेल्या, वैभवशाली, सुरक्षित व जोडलेल्या पालघरच्या उज्ज्वल भविष्यासाठी बांधकाम विभाग कटिबद्ध आहे.

पालघर जिल्ह्याची निर्मिती

पालघर हा पूर्वी ठाणे जिल्ह्याचा भाग होता. प्रशासकीय सोयीसाठी १ ऑगस्ट २०१४ रोजी ठाणे जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले आणि महाराष्ट्र राज्यातील ३६ वा नवीन जिल्हा म्हणून पालघरची निर्मिती झाली. हा जिल्हा उत्तर कोकण किनारपट्टी आणि सह्याद्रीच्या डोंगररांगांच्या पश्चिम उतारावर पसरलेला आहे.

जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ ४,६९७ चौ. किमी. आहे. सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग कोकण अंतर्गत अधीक्षक अभियंता यांच्या अधिनस्त, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग—पालघर हे कार्यालय कार्यरत आहे. विभागांतर्गत वसई उपविभाग क्र. १, पालघर उपविभाग क्र. १ व क्र. २, डहाणू आणि तलासरी उपविभाग कार्यरत आहेत.

दृष्टी आणि ध्येय

दृष्टी

महाराष्ट्रात अखंड जोडणी आणि कार्यक्षम सेवा वितरणासाठी मजबूत, शाश्वत आणि उच्च-गुणवत्तेची सार्वजनिक पायाभूत सुविधा विकसित व टिकवून ठेवणे.

ध्येय

  • उच्च-गुणवत्तेचे रस्ते, पूल आणि सरकारी इमारती निर्माण व देखभाल करणे
  • बांधकामामध्ये नविन तंत्रज्ञान व शाश्वत पद्धती स्वीकारणे
  • पायाभूत प्रकल्पांची प्रभावी अंमलबजावणी व वेळेवर पूर्णता सुनिश्चित करणे
  • सुरक्षित व विश्वसनीय परिवहनासाठी सार्वजनिक सेवा उपलब्ध करणे
  • राज्याच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने सुधारणा करणे

उद्दिष्टे आणि कार्य

सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्रातील विविध विकास उपक्रम राबवितो:

  • नवीन बांधकामे: रस्ते, पूल आणि सरकारी इमारती बांधणे
  • देखभाल आणि दुरुस्ती: विद्यमान इमारती व रस्त्यांची नियमित देखभाल
  • ठेव अंशदान प्रकल्प: विविध विभाग व संस्थांसाठी बांधकामे
  • आपत्ती-पुनर्वसन: पूर, भूकंप इत्यादींनंतर पुनर्वसन प्रकल्प
  • व्हीआयपी पायाभूत सुविधा: गरजेनुसार हेलिपॅड बांधकाम
  • भाडे प्रशासन, सुविधा आरक्षण, बांधकाम परवाने आणि अनधिकृत बांधकामांवर आळा
  • सुरक्षा प्रमाणपत्रे, जमीन भाडेपट्टा, हरित उपक्रम

इतिहास

  • वसईवर पोर्तुगीजांचे अधिराज्य होते; पेशवाईत चिमाजी अप्पांनी तेथील सत्ता संपुष्टात आणली.
  • १९४२ च्या ‘चले जाव’ आंदोलनात पालघरने महत्त्वाची भूमिका बजावली.
  • सातपाटी, नांदगाव, पालघर, मुरबे व शिरगाव येथील पाच हुतात्म्यांच्या स्मरणार्थ पालघर शहरात हुतात्मा चौक उभारण्यात आला आहे.
  • जव्हार येथील राजे मुकणे यांचे संस्थान, त्यांचा ऐतिहासिक राजवाडा आजही इतिहास सांगतो.

सांस्कृतिक वारसा

जिल्ह्यात वारली, कातकरी, मल्हार कोळी इत्यादी आदिवासी जमाती राहत आहेत.

  • वारली चित्रकला – ११०० वर्षांचा वारसा, निसर्गरंग, तांदुळ पीठ आणि बांबू काडीने साकारलेली कला
  • तारपा नृत्य – आदिवासींच्या सामूहिक सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक

भौगोलिक माहिती

घटकतपशील
एकूण क्षेत्रफळ४६९६.९९ चौ. कि.मी.
तालुकेपालघर, वसई, डहाणू, तलासरी, वाडा, विक्रमगड, मोखाडा, जव्हार
नद्यावैतरणा, उल्हास, देहर्जे, पिंजाळ, सूर्याव, तानसा
पर्जन्यमान२०००–३५०० मि.मी.
प्रमुख धरणेदेहर्जे, तानसा, कवडास, धामणी, वांद्री, सूर्य

औद्योगिक माहिती

जिल्ह्यात जंगलपट्टी, बंदरपट्टी आणि पठारी प्रदेश अशा तीन भौगोलिक पट्ट्यांमध्ये वेगवेगळे उद्योग विकसित झाले आहेत.

  • डोंगराळ भाग: (जव्हार, मोखाडा, विक्रमगड) — भात, नागळी शेती; गौण उत्पादन: मध, लाख, लाकूड, औषधी वनस्पती
  • बंदरपट्टी: (सातपाटी, दांडी, नायगाव, अर्नाळा, चिंचणी, बोर्डी) — मासेमारी, कोळंबी संवर्धन, चंदेरी पापलेट
  • औद्योगिक क्षेत्रे: एमआयडीसी, तारापूर, बोईसर, वसई–विरार

एकूण: ५७५७ लघु उद्योग, १८८३ अस्थायी उद्योग, ४२७ मोठे/मध्यम उद्योग

प्रशासकीय माहिती

  • तालुके:
  • पंचायत समित्या:
  • ग्रामपंचायती: ४७३
  • जनसंख्या (२०११): २९,९५,४२८
  • महत्त्वाचे प्रकल्प: तारापूर अणुउर्जा केंद्र, डहाणू औष्णिक केंद्र

पर्यटन विषयक माहिती

नैसर्गिक, ऐतिहासिक व धार्मिक पर्यटन स्थळे:

  • समुद्रकिनारे: केळवा, डहाणू, बोर्डी, अर्नाळा, माहिम, शिरगाव
  • जव्हार: दाभोसा धबधबा, छोटा महाबळेश्वर
  • ऐतिहासिक: अर्नाळा किल्ला, केळवा समुद्रातील किल्ला, गंभीरगड, काळदुर्ग, कमाणदुर्ग, जव्हार राजवाडा
  • धार्मिक: जीवदानी माता मंदिर (विरार), शितला देवी (केळवा), महालक्ष्मी देवी (डहाणू), इस्कॉन मंदिर, सेंट पीटर्स व सेंट जेम्स चर्च, गौशिया मस्जिद (वसई)